
पंढरपूर ( जनक्रांती न्युज प्रतिनिधी):
येथील चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे भाविक जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
या मध्ये दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे तर एका महिलेचा शोध सुरू आहे.
सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ असे मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत. तर एका महिलेचा शोध सुरू आहे. आज सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिकाजवळ आल्या होत्या. उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या आहेत.
यावेळी प्रशासनाचे जीव रक्षक उपस्थित नव्हते. जर जीवरक्षक उपस्थित असते तर ही घटना टाळता आली असती.
नदीला अती मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा या ठिकाणी हजर नसल्याचा आरोप यावेळी मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.